पुन्य वार्ता
संपादक..
अटलजी अडवानी यांनी स्थापन केलेला भाजपा दोन खासदारवरून बहुमताने तीन वेळा अटलजी चे सरकार नंतर मोदी शाह जोडीने पूर्ण बहुमताने तिसऱ्यादा सरकार स्थापन करित जगातील सर्वात मोठा पक्ष असे नावारूपास आणला आहे.
भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच भाजपचा आज 45 वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला 1984 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. तीन वेळा अटलजी पंतप्रधान झाले. 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये जागांची संख्या 300 च्या पुढे गेली. 2024 साली पुन्हा भाजपा सरकार नरेंद्र मोदी च्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झाले.
बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली. अडवाणींनी भाजपची स्थापना कशी झाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की, 1980 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातील संघविरोधी मोहिमेने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. याचा काँग्रेसला स्पष्टपणे फायदा झाला आणि निवडणुकीत जनता पक्षाची कामगिरी खालावण्याचा प्रयत्न झाला. एप्रिलमध्ये नवी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय होणार होता.
भारतीय जनता पक्ष सशक्त, सामर्थ्यवान, समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी सतत सक्रिय आहे. प्राचीन भारतीय सभ्यता आणि संस्कृती आणि तिची मूल्ये यांच्यापासून प्रेरणा घेऊन आधुनिक दृष्टीकोन असलेल्या पुरोगामी आणि प्रबुद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर एक महान ‘जागतिक शक्ती’ आणि ‘जागतिक गुरु’ म्हणून प्रस्थापित झालेल्या राष्ट्राची पक्षाची दृष्टी आहे. यासोबतच जागतिक शांतता आणि न्याय्य आंतरराष्ट्रीय व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जगातील राष्ट्रांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असावी.
भारतीय राज्यघटनेत लिखित मूल्ये आणि तत्त्वे यांच्यासाठी भाजप प्रामाणिकपणे काम करते आणि लोकशाही व्यवस्थेवर आधारित राज्याला आपला आधार मानते. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय, समान संधी आणि धार्मिक श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्व नागरिकांना जात, पंथ किंवा लिंग याची पर्वा न करता, लोकशाही राज्याची स्थापना करणे हे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्मता मानवता वाद ‘ भाजपने आपले वैचारिक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले आहे. याशिवाय अंत्योदय, सुशासन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, विकास आणि सुरक्षा यावरही पक्षाचा विशेष भर आहे. पक्षाने ‘पंचनिष्ठा’ नावाच्या पाच मुख्य तत्त्वांवर आपली निष्ठाही व्यक्त केली. ही पाच तत्त्वे आहेत – राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय अखंडता, लोकशाही होय.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय विचारधारा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्षाचे विषधी माहिती भारतीय जनता पक्ष हा देशातील दोन सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. सध्या भारतीय जनता सत्ताधारी पक्ष आहे, ज्याची केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारे आहेत भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयंसेवक दल पासून प्रेरित आहे. आरएसएस ही हिंदू विचारसरणीची संघटना आहे. जनसंघाची स्थापना २१ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ प्रसाद मुखर्जी यांनी केली होती. १९७० मध्ये अनेक पक्षांचे विलीनीकरण आल्यानंतर त्याचे नाव जनता पक्ष असे ठेवण्यात आले, परंतु १९८० मध्ये जनता पक्षाचे शकले झाल्यानंतर त्याची पुनर्रचना होऊन त्याचे नाव भारतीय जनता पक्ष (भाजप) ठेवण्यात आले. १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या, त्यापैकी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही एक जागा जिंकली. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ असून सार्वत्रिक निवडणूकीत प्रचंड बहुमत मिळाले आणि भाजपने लोकसभेत २८२ खासदार जिंकले, तर २०१९ च्या निवडणुकीत ३०३ खासदार जिंकत एकहाती सत्ता मिळवली भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदीत भारतीय जनता पार्टी हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या संता असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते.
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ स्थापना केली. काँग्रेस तत्कालीन पंतप्रधाना भारतामधील हिंदूचे हित जपने ही जनसंघाची उदिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर संपूर्ण भारतात घेतला जावा अशी भूमिका जनसंघाने घेतली दरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे कामीरच्या तुरुंगात निधन झाले.
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकीत जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरंगात डांबले गेले गेले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला प्रचंड बहुमत बहुमत निळाले मोराराजी देसाई पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाले. परंतु अंतर्गत कलहा ने
ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले.
भाजपा चे आजपर्यंत झालेले राष्ट्रीय अध्यक्ष
१९८०-८६ अटलबिहारी वाजपेयी, १९८६-९१ लालकृष्ण अडवाणी,
१९९१-९३ मुरली मनोहर जोशी,
१९९३-९८ लालकृष्ण अडवाणी
१९९८-२००० कुशाभाऊ ठाकरे
२००० -०१ बंगारु लक्ष्मण,
२००१-०२ जन कृष्णामूर्ती,
२००२-०४ व्यंकय्या नायडू,
२००४-०६ लालकृष्ण अडवाणी ,
२००६-०९ राजनाथ सिंह,
२००९-१३ नितीन गडकरी,
२०१३-१४ राजनाथ सिंह
२०१७, अमित शाह
२० जानेवारी २०२० पासून जे.पी. नड्डा
भाजपा स्थापनेनंतर अटलजी व मोदीजी तीन वेळा पंतप्रधान झाले. अटलजींच्या वेळी अनेक पक्षाचे सरकार सांभाळत तारेवरची कसरत करत पोखरण ची अणुबॉबम चाचणी केली, पाकिस्थान बरोबर संबंध प्रस्थापित केले. कारागील युद्ध जिंकले. कवी मनाचे अटलजी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले.
पूर्ण बहुमताने सरकार आलेले मोदीजींनी भाजपा ने दिलेले आश्वासन पूर्ण केले. काश्मीर मध्ये एक ही रक्ताचा कलम ३७० हटवले, देशात कुठंही दंगल न होता भव्य राममंदिर उभारले. तीन तलाक कायदा रद्द केला. नवीन संसद भवन बांधले, महिला विधेयक मंजूर करून महिलांना संसद व विधानसभेत आरक्षण दिले. वाकफ़ बोर्ड कायदा सुधारणा विधेयक मंजूर केले. समान नागरी कायदा झाला की भाजपा ची सर्व आश्वसने पूर्ण झाली.
भाजपा हा लोकशाही मानणारा पक्ष असून पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जात असून भाजपा ला या महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष लाभणार असून नवीन अध्यक्ष कोण होईल हे सांगता येत नाही. बाकी सर्व पक्ष घराणे शाही चे आहेत. एकमेव भाजपा पक्ष परिवार वादी नाही. बूथ अध्यक्षा पासून राष्ट्रीय अध्यक्षा पर्यंत अतिशय पारदर्शक कारभार राबविला जातो. ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रिय सदस्य नोंदणी केली जाते. त्यातून मंडल अध्यक्ष निवडला जातो. मंडल अध्यक्षासाठी ४५ वयाची अट घातली असून मंडल विधानसभेचे शंभर बूथ नुसार केले आहे. जिल्हा अध्यक्षासाठी वयाची अट ठेवली असून ५५ वय निश्चित केले आहे.

