पुण्य वार्ता
एकदरे /प्रतिनिधी( बाजीराव भांगरे)-
अकोले तालुक्यातील कोकणवाडी ते पाडोशी रस्त्याची संरक्षण भिंत कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी काकड ठेकेदाराला तसेच इंजिनियर गणेश शेळके व प्रशासनाला वारंवार सांगूनही ते काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्याच पावसामध्ये संरक्षण भिंत कोसळून भिमा हरी ईदे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा स्टीलचा वापर दिसला नाही. पूर्णपणे मातीमध्ये सिमेंट खडी टाकून भिंत बांधून ते काम पूर्ण केले असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.भिंत कोसळून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून तात्काळ प्रशासनाने येऊन पंचनामे करावे असे तेथील शेतकऱ्याने मागणी केली आहे.आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे.
यावेळी उपस्थित स्थानिक शेतकरी भिमा ईदे,लक्ष्मण ईदे,दशरथ जाधव, तुकाराम जाधव,वाळीबा जाधव,रमेश भांगरे, नारायण मुरकुटे,माझी सरपंच रामचंद्र मुरकुटे, मच्छिंद्र भांगरे,ग्रामरोजगार सेवक प्रकाश मुरकुटे, यावेळी उपस्थित होते.

