पुन्य वार्ता
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आयोजित शेतकरी जागर मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू बोलताना म्हणाले भारत हा कृषीप्रधान देश आहे या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राजकीय व्यवस्थेला कुठलेही फिकीर नाही याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी बांधव जात आणि धर्म या अफूच्या गोळीवर जगत आहे. देशातील नंबर तीन ची असलेली अर्थव्यवस्था आज मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे आहे रे आणि नाही रे वर्गाचा लढा हा संपत नाही याचे मुख्य कारण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बजेट दुर्लक्षित करून त्याचे स्थान अत्यंत नगण्य ठेवण्यात आले. महाराष्ट्र मध्ये जाती-धर्माच्या नावावर प्रचंड दंगली पेटवल्या जातात मीडियाही एखाद्या नेत्याचा फाटलेला बूट दिवसभर दाखवत असते मात्र शेतकरी पुत्र आत्महत्या करत असताना त्याची साधी दखल गावातील लोक देखील घेत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होईल असे वाटले होते परंतु आर्थिक बळावर राजकीय व्यवस्थेने प्रत्येक शेतकऱ्याला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यासारख्या गटांमध्ये बांधून ठेवून मेंदूचा ताबा घेतला शेतकरी बाप आत्महत्या करत असताना निषेध सुद्धा नोंदविण्यासाठी शेतकरी तयार नाही याचे मुख्य कारण म्हणजे जाती धर्म व्यवस्था निर्माण करून त्यास बंधनात अडकवण्याचे व्यवस्थित रित्या पाडण्यात येत आहे यातून सर्वात मोठे नुकसान शेतकरी चळवळीचे झालेले आहेत. वाढती महागाई आणि यामागच्या काळात दिव्यांगांना पंधराशे रुपये मानधन मिळते यातून त्याचे जीवन जगणे अवघड होत आहे आमदारांचा पगार 55000 हजार वरून साडेतीन लाखापर्यंत पोहोचला त्याबद्दल कोणी काही बोलत नाही फक्त नको असलेले विषय वर काढून शेतकरी व दिव्यांगांना भडकवले जाते अहिल्या नगर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलेले असताना राजकीय व्यवस्था त्याकडे लक्ष देणार नाही परंतु बच्चू कडू रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या व्यवस्थेला प्रश्न विचारत राहील प्रहार पक्ष निर्माण केलेला नसून अन्यायाला वाचा फोडणारी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन या साठी दिनांक आठ जून पासून अन्न त्याग आंदोलन करणारा असून हे आंदोलन जात आणि पक्ष धर्म विसरून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी करणार आहे असे त्यांनी सांगितले या शेतकरी जागर सभेचे आयोजन नेताजी सुभाष चंद्र बोस संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गोर्डे, ग्रामपंचायत डोंगरगाव व ग्रामस्थानी केले होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष दिव्यांग बांधव व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी बच्चुभाऊंना विश्वास दिला आपण करत असलेल्या अन्न त्याग आंदोलनात पक्षभेद विसरून आम्ही फक्त शेतकरी आहोत यासाठी मोठ्या संख्येने येणार आहोत.


