पुन्य वार्ता
कोतुळ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या आजी स्वर्गीय गं.भा. स्वर्गीय पार्वतीबाई बाबुराव आरोटे आरोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोतुळ येथील कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकऱ्यांना संगीत साहित्य वाटप करण्यात आले. रामनवमीच्या पावन पर्वकाळात, ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात तबला, पखवाज, हार्मोनियम यांसारख्या संगीत साधनांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास कोतुळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय लोखंडे, पत्रकार सुनील गीते, पत्रकार विनय समुद्र, कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज गोडसे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोकराव शेळके, ज्येष्ठ पत्रकार विनय समुद्र, माजी उपसरपंच संजय लोखंडे, सुनील गीते संस्थेचे मार्गदर्शक राधाकिसन गोडसे, सौ,परिघाताई आरोटे तसेच गावातील अनेक मान्यवर, पालक आणि बाल वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, “योग्य वेळी दिलेले योग्य संस्कार हेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात. त्यांच्यातून आदर्श नागरिक घडतात जे भविष्यात देश व समाजाची सेवा करतात. कोतुळ हे माझे मामाचं गाव आहे. माझं संपूर्ण बालपण इथेच गेलं. विनय समुद्र, अशोक शेळके, सुनील गीते यांच्यासोबतच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. मी कितीही मोठा झालो तरी जिथे माझं बालपण गेलं त्या भूमीचं काहीतरी देणं लागतो ही भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे या गावातील बाल गोपालांसाठी काही चांगलं करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे.”
कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल विशेष कौतुक करत त्यांनी संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “या पुढेही या संस्थेच्या माध्यमातून गावातील बाल वारकऱ्यांना संस्कार व सांस्कृतिक शिक्षण देण्यासाठी मला जे काही करता येईल, ते मी नक्कीच करीन,” असेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज गोडसे यांनी तर उपस्थितांचे आभार पत्रकार सुनील गीते यांनी मानले. या उपक्रमामुळे कोतुळ गावात सामाजिक व सांस्कृतिक जागर निर्माण झाला असून, पार्वताआजींच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ग्रामस्थांना व बाल वारकऱ्यांना एक प्रेरणादायी संदेश मिळाला.

