पुन्य वार्ता
आळंदी…….–
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित ज्ञानेश्वर पादुका रथ यात्रेचे उद्घाटन समाजरत्न डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी विविध धर्मगुरू, मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला.
श्री विष्णू महाराज केंद्रे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, श्री बाळासाहेब वडगावकर, राहुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पत्रकार संजय फुल सुंदर अर्जुन मेदनकर, एम. डी. पाखरे, नंदकुमार वडगावकर, बंडू बाबा पालवे, पंढरीनाथ जरे, अनिल जोगदंड, शेषमणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिका समोर पूजन विधी पार पडला.
विशेष आकर्षण ठरला एन. के. टी. चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित महाप्रसाद. नानजीभाई ठक्कर यांच्या पुढाकाराने जवळजवळ दीड लाख वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी आमदार मनोहर दिवाणे, नगराध्यक्ष ज्ञानेश्वर रायकर, उपमहापौर सागर भोसले, पोलीस निरीक्षक, बंडू तात्या पालवे, सौ. मंगलाताई सेवेकरी, सौ. सुवर्णाताई ठाकरे, राजेंद्र पुराणी, राजेंद्र पांडे जी, प्रकाश पार्टे, देवेंद्र भारती हे उपस्थित होते.

डॉ. नानजीभाई ठक्कर यांनी वारकऱ्यांना वारीत व्यसनमुक्तीचे व जीवनात सदाचरणाचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर एनकेटी चॅरिटेबल संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवांबाबतही माहिती दिली.
नगराध्यक्ष ज्ञानेश्वर रायकर यांनी या वेळी सांगितले की, श्री क्षेत्र आळंदी येथे तब्बल ३१ कोटी रुपये खर्चून एक भव्य मंदिर उभारले जात आहे. या पवित्र कार्यासाठी काशीमा खिमजीभाई ठक्कर यांनी जमिन दान करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. वारीत सहभागी झालेल्या भाविकांची गर्दी ही शिस्तबद्ध आणि सेवाभावी दिसून आली. संपूर्ण सोहळा अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.

