पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
आधीच अडचणीत शेतकरी अडचणीत असताना त्यात ह्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली आहे.
शेतकरी आधीच अडचणीत असताना अवकाळीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असून त्यात ही अस्मानी संकटाची भर पडली असून शेतात असणारे कांदा,गहू, आदि पिकांचे नुकसान झाले असून आधीच शेतकऱ्यांचा मालाला कोणताही भाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्ण हतबल झाले आहे. रब्बी हंगामात शेतकरी अडचणीत सापडला. फळ बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम वर पूर्णपणे पाणी फेरले असून शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.तेव्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष सुशांत आरोटे, तालुका उपाध्यक्ष सुनील पुंडे,युवक अध्यक्ष शुभम आंबरे, कार्याध्यक्ष संतोष उगले टेलर, द्यानेश्वर आहेर माऊली, सोमनाथ आहेर, प्रवीण आहेर,आदि शेतकऱ्यांनी केली आहे.
