चिकणी (वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील चिकणी येथे अधिकृत क्रीडांगण व्हावे यासाठी चिकणी दोन तरुणांनी चिकणी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले
चिकणी गावातील गट नंबर ४ मध्ये असणाऱ्या प्रशस्त जागेमधील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व गावातील तरुणांना खेळण्यासाठी सुसज्य क्रीडांगण व्हावे यासाठी तरुणांनी वारंवार चिकणी ग्रामपंचायत तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदन देऊनही कुठल्याही अधिकाऱ्याने तिथे लक्ष घातले नाही. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी आपल्या हक्काच्या क्रीडांगणासाठी आमरण उपोषणाचा इशारा देऊन पाच दिवस २०/३/२०२५ पासून काल सोमवार दिनांक २४/३/२०२५ पर्यंत साखळी उपोषण केले तरीही त्याची कोणीही दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त असणाऱ्या तरुणांनी आपले प्रतिनिधी संगमनेर तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद निवृत्ती वर्पे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चंद्रकांत वर्पे माऊली यांनी वार मंगळवार दिनांक २५/३/२०२५ असून आमरण उपोषण सुरू केले आहे
जोपर्यंत त्या ठिकाणावरील अतिक्रमण हटवून तेथे आमच्या गावातील तरुणांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हक्काचे क्रीडांगण उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे प्रसंगी आम्ही देह ठेवण्यास तयार असल्याचे दोन्हीही उपोषणकर्त्यांनी सांगितले
या उपोषणाला एकविरा फाउंडेशन च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर जयश्री ताई थोरात कॉम्रेड कारभारी पाटील उगले यांनी
उपोषण स्थळी जाऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.
या उपोषणाला चिकणी येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवित सुमारे ४५० तरुणांनी व ग्रामस्थांनी स्वाक्षरी करून या आमरण उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. जर दोन दिवसात प्रश्न मार्गी न लावल्यास अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी व चिकणी येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
