पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सध्या पाऊस अचानक कोणत्याही भागात होत असून वादळी वऱ्यांसाह अनेक लोकांचे घरांचे पत्रे तर विद्युत तारेवर झाडें झुडपे पडलेले आहे तर अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतात नष्ट झालेले आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे तलाठी सर्कल यांना सांगून संगमनेर तालुक्यात सर्वत्र पंचनामें करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
चिकणी आणि निमगाव भोजापूर परिसरात काल अक्षरशः अवकाळी पावसाने थैमान घातलं अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाने कांदे कडून शेतात च ठेवले आहे तर काही ठिकाणी डाळिंब, मका,ठिकाणी तर रस्त्यावर झाडे पडलेली आहेत प्रशासनाने याकडे लक्ष वेधून झालेल्या नुकसानी चे तातडीने पंचनामे करावें अशी मागणी बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक व संगमनेर चे किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.


