पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थे अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांनी स्व.मधूकररावजी पिचड यांना आदरांजली देण्यासाठी,अभिवादन सभेचे आयोजन राजूर ता.अकोले येथे करण्यात आले होते.स्व.पिचड यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत व आठवणीना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली.
याप्रसंगी माजी आमदार तथा अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड,आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सेक्रेटरी एम. एम.भवारी,संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे,संस्थेचे उपाध्यक्ष सी.बी.भांगरे,कोषाध्यक्ष पांडुरंग खाडे, संचालक गणपत भांगरे,सुनील सारुक्ते, भरत घोरपडे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संस्थे अंतर्गत राजूर,शेंडी,एकदरे,देवठाण,मान्हेरे, कोथळे, खडकी या आश्रमशाळेतील प्रातिनिधिक शिक्षकांनी आणि वारुंघुशी,राजूर व चिंचवणे या विद्यालयातील शिक्षकांनी स्व.मधूकररावजी पिचड यांच्या कार्याचे संकलन करत अभिवादन सभेत त्याचे सादरीकरण केले.स्व.मधुकरराव पिचड यांचा जीवन परिचय,राजकीय कारकीर्द,जलनायक व पाणीदार नेतृत्व,संघटनात्मक कार्य,पेसा कायद्याची निर्मिती,आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट,आदिवासी महामंडळाची निर्मिती,शैक्षणिक योगदान,धरणांचे शिल्पकार,अकोले तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून निभावलेली भूमिका आदी विषयांना स्पर्श कारत आठवणींना उजाळा दिला.स्व.मधुकरराव पिचड यांची दरवर्षी १ जून रोजी जन्मतिथी व ६ डिसेंबर रोजी पुण्यतिथी शाळेंच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करत साजरी करण्याचे ठरले तसेच संस्थेच्या वतीने स्व.पिचड यांचे स्मरणार्थ क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरले यावेळी राम पवार सर,उज्वला वाकचौरे,शिवराम कोंडार, मिनाक्षी पाटील,अनिल नवले,राजेंद्र आंबरे,अरुण सोनवणे,गणेश मेड,विलास गोसावी,सोनवणे संचिता जाधव,वंदना घुले आदी शिक्षकांनी शाळेच्या वतीने वरील विषयांना स्पर्श करत स्व.पिचड यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी एम.एम.भवारी हे होते.
यावेळी मुख्याध्यापक कैलास तेलोरे,सौ.सुरेखा खिलारी,राजेंद्र खाडे,विक्रम आरोटे,अशोक भालेराव,मारूती तातळे,प्रल्हाद नेहे,मंजुषा शेडगे,शिवराम कोंडार,सुरेश भांगरे, मिनाक्षी पाटील,शिरीष पाबळे, ज्ञानदेव पिचड,सुखदेव बोऱ्हाडे,सुदाम सदगीर,राजेंद्र भांगरे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.


