पुन्य वार्ता
संगमनेर -वार्ताहर
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.बक्षिसांमध्ये संगमनेर तालुक्यातील दहा ग्रांमपंचायतीने चार कोटी रूपयाचे बक्षिसे प्राप्त करत राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे.एकाच तालुक्याला मिळालेली ही सर्वाधिक बक्षिस संख्या मानली जात आहे.
राज्य सरकारच्या वतीने पृथ्वी,वायू,जल,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 4.0 हे एक एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीकरीता राबवण्यात आले.या अभियानात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था आणि 22 हजार 218 ग्रांम पंचायती अशा एकूण 22 हजार 632 संस्थानी सहभाग नोंदवला होता.यात तीन गटात संस्थाचे डेस्कटॉप व फिल्ड मूल्यमापन करण्यात आले.अमृत गटासाठी11 हजार 600 गुण,नगर परिषदा व नगर पंचायतीसाठी 11 हजार 400 व ग्रांमपंचायत गटासाठी 11 हजार 600 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले.त्रयस्थ यंत्रनेमार्फत मूल्यांकन करण्यात आल्यानंतर शासनाने बक्षिसे जाहीर केली आहेत.10 हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात घुलेवाडी ग्रांमपंचायतीने राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्यासाठी ग्रांमपंचायतीला दिड कोटी रूपयाचे बक्षिस प्राप्त होणार आहे.भूमी थीमटीक मध्ये घुलेवाडी ग्रांमपंचायतीलाच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत 75 लाखाचे बक्षिस प्राप्त केले आहे.नाशिक विभाग स्तरावरील गुंजाळवाडी ग्रांमपंचातीला दहावा गुणानुक्रम प्राप्त झाला आहे त्याकरीता पंधरा लाखाचे बक्षिस प्राप्त होणार आहे..पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रांमपंचायतीत विभाग स्तरावर धांदरफळ बुद्रुक ग्रांमपंचायतीने गुणानुक्रमांक पंधरा मिळवत पंधरा लाख रूपयाचे बक्षिस प्राप्त केले आहे.अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या ग्रांमपंचायतीत राज्यस्तर उत्तेजनार्थ पारितोषक खांडगाव ग्रांमपंचायतीस जाहीर झाले असून त्याकरीता पंधरा लाख रूपयाचे बक्षिस मिळणार आहे.नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव ग्रांमपंचायतीना पंधरा लाखाचे बक्षिसे जाहीर झाली आहेत.1.5 हजार ते 2.5 लोकसंख्येच्या ग्रांमपंचायतीमध्ये लोहारे ग्रांमपंचायतीने विभाग स्तरावर क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखाची बक्षिसे प्राप्त केली आहे.1.5 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रांमपंचायतीत विभाग स्तरावर चौरकोठे ग्रांमपंचायतीने क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखाचे बक्षिस मिळवले आहे.तिगाव ग्रांमपंचायतीने राज्यस्तरावरील 50 लाख रूपयाचे तिसरे बक्षिस प्राप्त केले आहे.
सर्वोत्तम कामगिरी करणारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यात अहमदनगर जिल्ह्याने व्दितीय स्थान प्राप्त केले आहे.तर नगरपरिषदेचा विचार करता संगमनेर नगरपालिकेला राज्य स्तरावर उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे.विभाग स्तरावर नाशिक विभागात जळगाव जिल्हा परिषदेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
हे सांघिक यश- नागणे
राज्यात संगमनेर तालुक्यातील दहा ग्रांमपंचायतीनी विविध स्तरावर क्रमांक प्राप्त करत सुमारे चार कोटी रूपयाची बक्षिसे प्राप्त केली आहे. वसुंधरेच्या संवर्धनामध्ये आपला वाटा तालुक्यातील ग्रामपंचायतीने उचललेला असून पर्यावरणपूरक काम करण्याची चळवळ तालुक्यात तयार झाली आहे.हे यश पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी,स्थानिक पातळीवर ग्रांमपंचायातीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कृषी अधिकारी वाळीबा उघडे यांच्या योगदानातून प्राप्त झाले आहे.हे यश सांघिक स्वरूपाचे आहे.यासाठी विभागीय आय़ुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.यापुढेही राज्य स्तरावरील विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन अधिकाधिक चांगले बक्षिसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहू.सर्वाधिक बक्षिसे मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.
अनिल नागणे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संगमनेर
