पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात पण आदिवासींना घडवणारं आदिवासी भागातील राजुर हे विद्येचे माहेरघर आहे म्हणून सर्वजण या संकुलाच्या पाठीशी उभे आहेत,असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यानी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे होत्या.यावेळी प्राचार्या संगीता परदेशी, रामनाथ भोजणे, प्राचार्य प्रकाश टाकळकर, संस्थेचे सचिव शांताराम काळे , मुख्याध्यापिका मंजुषा काळे, उपसरपंच संतोष बनसोडे,सुमती मुळे,माधवी मुळे , दत्ता भोईर , रजनी टिभे, गभाले गुरुजी,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते ,आबा मंडलिक,प्रकाश महाले ,शहाजी वाकचौरे,जी.डी. आरोटे,विलास महाले,अंतनु घोडके,सयाजी अस्वले,अनंत घाणे,गंगाराम धिंदळे,सारिका वालझाडे,विलास बागड,नाडेकर सर हे उपस्थित होते.
प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, व्यासपीठावरील माणसामुळे आपल्याला कुठे जायचे आहे यासाठी आम्ही तुमच्यासमोर आहोत.पोपरे ताईंसारख्या अवघ्या देशाला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व या परिसरात घडलं.
ज्ञान विज्ञान संस्कृती यांची उपासना ज्या विद्यालयात होते त्या शाळेतून शिकणारे विद्यार्थी निश्चितच समाजाचे विविध क्षेत्रात मार्गदर्शक बनत असतात,
जो कर्ता असतो तो समाजाचा शिल्पकार असतो समाजात ठायी ठायी असे कर्ते निर्माण होण्याची आवश्यकता आहे. या संस्थेमध्ये एक एक माणूस जोडला जातो,आज सरकारवर बरेच अवलंबून राहतात,आता फक्त सरकारनेच परीक्षा द्यावी आणि प्रमाणपत्र आपल्याला मिळावे अशी अपेक्षा धरु नये . परावलंबी होऊ नका स्वावलंबी बना,आपल्याला जे यश मिळेल ते आपल्या हाताने मिळाले पाहिजे,खूप मोठे व्हा,महा पुरुषांचे पाठबळ तुमच्या पाठीशी आहे.समाजात जो कर्ता आहे तोच खरा शिल्पकार आहे . स्वातंत्र्य मिळवून आज 80 वर्षे झाले .तरीही आज वंचित ,निराधार मुलं आहेत . खरंच आपण स्वतंत्र झालो का ,? हे स्वातंत्र्य फुलवायचे असेल ,विश्वगुरू व्हायचे असेल तर वंचित निराधारांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी शिक्षक हेच खरे गुरुवर्य आहेत यांच्या आशीर्वादाने विद्यार्थी पुढे जातील, मला शिक्षण भेटले नाही,गरिबी आडवी आली . पण समाजसेवेचे व्रत मिळालं हे माझं भाग्य आहे. हळदी कुंकवा पासून माझी खरी समाजसेवा सुरू झाली,हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी रोपे भेट देऊ लागली आणि आज बियांचे पाकीट देते,
वाढदिवसाला केक कापून पार्ट्या देऊ नका,रोपे भेट द्या ,बिया भेट द्या ,त्याचे झाड वाढते तसं तुमचे आयुष्य वाढेल पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गाचे ज्ञान घ्या,मातीशी नाळ जोडा,पद्मश्री नारीशक्तीचा पुरस्कार हा माझा नसून या मातीचा हा पुरस्कार आहे, ज्ञान मंदिरात शिकून चांगले काम करा,चांगले व्हा भविष्यात नाव कमवा मत व्यक्त केले.
यावेळी रामनाथ भोजने व प्राचार्या संगीता परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजूषा काळे यांनी केले तर अहवाल वाचन प्राचार्य किरण भागवत यांनी केले . त्यानंतर विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले शेवटी विद्यार्थ्यांना शासकीय स्कीम मधून मिळालेल्या सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काळे, सारिका करपे यांनी केले . आभार विनायक साळवे यांनी मानले.

