पुण्य वार्ता
गणोरे- प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर
दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर भाव मिळावा व शेतकऱ्यांची कर्ज माफी करा अशी मागणी करत येत्या आठ दिवसात हा निर्णय झाला नाही तर मुंबई ला जाणारा दुध पुरवठा रोखु असा गंभी इशारा शेतकरी नेते राजु शेट्टी यांनी दिला.
गणोरे ( ता. अकोले) येथे दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी १ जुलै शेतकरी दिनी सकाळ पासुन शुभम आंबरे व संदिप दराडे हे उपोषण करत आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गणोरे येथे आले असता ते बोलत होते. दुसऱ्या दिवशी मधुकर तळपाडे, अमित भांगरे,आम्ही हिवरगांव मित्र मंडळ,राष्ट्रीय किसान मोर्चा संगमनेर,अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ,डोंगरगांव,हिवरगांव,पिंपळगांव ग्रामपंचायत,महाराष्ट्र नव निर्माण सेना संगमनेर आदी उपोषणास पाठीबा दिला, रात्री शेतकरी राजुशेट्टी उपोषणस्थळी दाखल झाले यावेळी बोलताना ते म्हणाले दुधाचे भाव वाढायच्या अगोदर खाद्य्याचे भाव वाढतात.आपण पाणी ७५ ते ८० रु लिटर ने पाणी विकत घेतो आणि पाण्याच्या अर्ध्या भावात दुध विकत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाअध्यक्ष सुशांत आरोटे,सोमनाथ आहेर,अनिल आंबरे,तुषार आंबरे,डोंगरगावचे माजी सरपंच बाबासाहेब उगले,मा.उपसरपंच अशोक उगले, हिवरगाव माजी उपसरपंच भाऊसाहेब (नाना) नाईकवाडी,नानासाहेब दळवी,सुभाष आहेर,सुलोचना शिंदे,नानासाहेब दळवी,अशोक आंबरे,गोविंद आंबरे,सोमनाथ आंबरे, ऍड नवनाथ फटांगरे, सुनील उगले, संतोष उगले, सोमनाथ आहेर,सुधीर उगले,विजय उगले आदी पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

