पुण्य वार्ता
प्रतिनिधी: संजय भाऊ गायकर
(अकोले)
डोक्यावरच छप्पर गेले, शेतीही गेली वाहून, साहेब आम्ही जगायचं कसं,अतिवृष्टीने बेहाल झालेल्या आदिवासी बांधवांचा सरकारला सवाल!
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी, घाटघर, पाचनई, अंबीत, एकदरे, शेनित, देवगाव, पिंपरकणे सह सर्व भागात तीन चार दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नदीनाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत. या पुरामुळे वारंघुशी डावखांडी येथील रोडवरील मोऱ्या वाहुन गेल्या, वाडी वस्तीच्या जनतेचे हाल झाले तसेच भात शेतींचे बांध फुटले. मुतखेल,कोलडेंभे,रतनवाडी आदि गावांसह शिंगणवाडी, जहागीरदारवाडी, बारी सह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भातशेती घरांच्या भिंतीची पडझड होऊन काही घरांचे कौले उडुन नुकसान झाले. सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत. कोलडेंभे येथे काही जनावरें दगावली आहेत. काही ठिकाणी पुरस्तिथी निर्माण झाली आहे. तरी शासनाने या बाबतीत शेतकरी यांना आर्थिक मदत करुन शेतकरी यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधीत नुकसान झालेले शेतकरी यांचे शेतीचे व घरांचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
ह्या बाबतीत जनतेच्या फोटो व नावासह समाज सेवक अनंत महादु घाणे, तुकाराम खाडे आणि सर्व कार्यकर्ते यांनी तक्रारी केल्या नंतर माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५/७/२०२४ रोजी मा.तहशिलदार मोरे साहेब, मा. कृषी अधिकारी साळी साहेब, मा. गटविकास अधिकारी चौरे साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा करून फोटो पाठवून तालुक्यातील झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी समाज सेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे, भरतजी घाणे, अशोक भोजने, तुकाराम सारूक्ते, मच्छिंद्र खाडे, सुभाष बांडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, सागर रोंगटे, पांडुरंग पदमेरे, दिपक भागडे सह आदिवासी भागातील शेतकरी ग्रामस्थ यांनी केली.
ह्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मा.तहसीलदर मोरे साहेब यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत!

