पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
पर्यावरण धर्मो रक्षती रक्षित: करूया पर्यावरणाचे रक्षण,होईल मानव जातीचे संरक्षण.या निसर्ग नियमानुसार पर्यावरणाला पुरक असे शाडू मातीचे गणपती बनविण्यात चिमूकले दंग झाले.अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात गणपती बनवा कार्यशाळा संपन्न झाली.विद्यार्थ्यांनी कला शिक्षक भाऊसाहेब कोते व रावसाहेब पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बनवले.
शाडूची माती,नैसर्गिक रंगाचा वापर,जलप्रदुषण रोखणे,मानवी आरोग्य,जैवविविधतेचे रक्षण व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमूकले हातांच्या बोटांनी गणरायाचे विविध रूपे साकारताना त्यांचे मातीकामातील कौशल्य विकसीत होताना कलात्मक कार्यशाळेतून मुलांमधील कौशल्य विकास होताना दिसत होते.प्राचार्य बादशहा ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली
विभाग प्रमुख प्रा.संतराम बारवकर व महेश दिंडे यांच्या नियोजनानुसार संदेश यात्रा काढून गणपती प्रतिष्ठापणा करण्यात आली.गणपती मंत्र घेण्यात आले.प्रा.बाळासाहेब घिगे यांना सहपत्नीक पुजेचा मान देण्यात आला.
[मातीपासून गणपती बनवताना आम्हा विदयार्थ्यांना फार आनंद वाटला. आमच्या हातून गणरायाचे रूप साकारताना आत्मिक आनंद मिळाला.नवनिर्मिती करता आल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे- विद्यार्थी]
[गुरुवर्य पाटणकर साहेबांच्या प्रेरणेतून सर्वोदय पारिवाराने पर्यावरण पुरक अभियान सुरू केले.विदयार्थ्यांनी माती भिजवण्यापासून तर समूहाने या मातीकामात सहभागी झाले. आम्ही विदयालयात विद्यार्थी समवेत कला शिक्षकांनी बनवलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. इतर सर्वांनी पर्यावरण पुरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी.सजावट करताना पाना,फुलांचा व वेलींचा वापर करावा तसेच विघटनशील कागदाचा वापर करण्यात यावा.या अभियानाचा राज्यभर प्रसार होईल हिच अपेक्षा- प्राचार्य बादशहा ताजणे]

