पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन अकोले शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DIET चे वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत ,भाभा अनुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे,मुंबई येथील सहाय्यक वैज्ञानिक राहुल भांगरे, शिक्षण विस्ताराधिकारी सविता कचरे व प्रा.शि.बँकेचे व्हा. चेअरमन कैलास सारुक्ते,
फेडरेशन जिल्हा सचिव आबाजी भांगरे, तालुका अध्यक्ष यशवंत खोकले,
आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वयाच्या बाराव्या वर्षी 172 गड किल्ले पादाक्रांत करून नुकतेच 1800 फूट उंचीचा महाकाय हरिचंद्र गड रॅपलिंग करणारी कुमारी.मनस्वी वैशाली संतोष बांडे,मंथन वेल्स सामान्य ज्ञान परीक्षेत इयत्ता दुसरीत 150 पैकी 150 गुण मिळवून राज्यात प्रथम येणारी स्वरांगी मंदा सिताराम भांगरे तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश पात्र परीक्षेत अलौकिक यश संपादन करणारे कुमारी.श्रीनिधी रोहिणी गंगाराम साबळे,ईश्वरी प्रियंका भगवंता साबळे,श्रावणी स्वाती साहेबराव वायळ चि.कार्तिक गुफाबाई सुभाष तळपाडे,जगदीश सुनीता शरद लोहकरे,केतन वैष्णवी विठ्ठल बारामते,आयुष कविता स्वप्नील धांडे,सार्थक धनश्री सुनील बांबळे तसेच 109 गड किल्ले सर करणारा दिव्यांग केशव भांगरे डाटा एन्ट्री ऑपरेटर नि. सहाय्यक यांचा पुष्पगुच्छ,ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जवाहर नवोदय प्रवेशपात्र परीक्षेमध्ये पात्र होऊन तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आहे, परंतु यापुढे तुम्हाला कठोर परिश्रम करून या स्पर्धेच्या युगामध्ये आपले सातत्य कायम ठेवावे लागेल असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण भांगरे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या ग्रामीण भागातून तुमचे निवड झाली आहे याचा सर्वात जास्त आनंद मला झाला आहे कारण निवड झालेले सर्व विद्यार्थी हे माझ्या जिल्हा परिषद शाळेतील आहेत आणि याचा मला अभिमानही आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयातून कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचे नाही असा मोलाचा संदेश आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
प्रमुख पाहुणे राहुल भांगरे यांनी मुलांना त्यांच्या जीवनातील नवोदय मधील किस्से सांगितले व तिथे गेल्यावर कसे रहायचे कोणाला काय म्हणायचे हे सांगितले .
त्यानंतर सारोक्ते सर यांनी मुलांना भविष्यात खूप मोठे स्वप्न घेऊन जगा यश नक्कीच तुमच्या जवळ आहे असे सांगितले.
तालुका अध्यक्ष यशवंत खोकले यांनी मुलांना स्पर्धेच्या युगात कसे टिकले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्तविक जिल्हा सचिव आबाजी भांगरे तर सूत्रसंचालन सचिव विकास साबळे यांनी केले।कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बबन बांबेरे (सल्लागार) विजेंद्र साबळे (सहसचिव) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी तालुका फेडरेशन सहकार्याध्यक्ष स्वाती लेभे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख अरुण खोकले (एस. टी महामंडळ वाहक,
तसेच रोहिणी शेळके, प्रियंका साबळे, वैशाली बांडे, धनश्री बांबळे, भारमल मॅडम,बाळासाहेब भांगरे सर, दुंदा ढगे सर ,गंगाराम साबळे सर ,केशव भांगरे सर, भांगरे संजय ,चंद्रभान मेंगाळ सर ,लक्ष्मण गवारी सर ,राघू भांगरे सर, एकनाथ भांगरे सर ,विजय भांगरे सर ,सिताराम भांगरे सर ,मंगेश बांडे सर,चंदर धिंदळे सर मुख्याध्यापक, बांडे सर मुख्या.मानेरे,साहेबराव वायळ सर, शरद लोहकरे सर, सुभाष तळपाडे सर,
तसेच पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्याध्यक्ष संजय गोडे यांनी आभार मानले
