पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सध्या पाऊस अचानक कोणत्याही भागात होत असून वादळी वऱ्यांसाह अनेक लोकांचे घरांचे पत्रे तर विद्युत तारेवर झाडें झुडपे पडलेले आहे तर अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतात नष्ट झालेले आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे तलाठी सर्कल यांना सांगून संगमनेर तालुक्यात सर्वत्र पंचनामें करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी. आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी व झाडेंझूडपे पडल्यामुळे महावितरण च्या अधिकाऱ्यांना सांगितले कि नागरिक लाईट पासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी घ्या असे सामाजिक कार्यकर्ते दिपक वर्पे यांनी तहसीलदार व महावितरण च्या अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे दिले.
